महार कोण होते? उदगम, संक्रमण, झेप
महार समाजाचा तेजस्वी
इतिहास यथावत मांडणारा शोधग्रंथ प्रसिद्ध लेखक व माझे मित्र संजय सोनवणी साहेबानी
लिहला असून तो उद्या प्रकाशित होत आहे. या ग्रंथाचे नाव आहे “महार कोण होते, उदगम,
संक्रमण, झेप”. आता पर्यंत अनेकानी महार समाजावर संशोधन केले. पण हे सर्व संशोधन महारांचा
गौरवशाली इतिहास सांगण्यात तोकडे पडायचे. अनेकांच्या व्याख्या, शब्दव्युत्पत्ती तर अयशस्वी
खटाटोप सदरात मोडणा-या आहेत. महार समाज या मातीतला एक प्रमूख, प्रबळ नि शूर समाज
होता हे सर्वाना मान्य होते पण संशोधनाच्या अभावापोटी ते सिद्ध करता येत नव्हते.
संजय सोनवणी साहेबानी महार
समाजावर अत्यंत महत्वाचे संशोधन केले. कालचा महार हा मध्ययुगात सामाजिक फटका
बसलेला एक रक्षक होता हे सिद्ध करताना या समाजाची पाळं मुळं एक एक शतक मागे मागे
नेत अर्वाचीन काळातील अस्तीत्व ने जबाबदा-या यांचे सखोल विवेचन केले आहे. त्याच
बरोबर आजून एक एक शतक मागे मागे सरकत या समाजाची प्राचिन काळातील भूमिका ही ’रक्षक’
अशी होती व गाव कुशीवरील अत्यंत जबाबदारीचे कार्य पाहणारा, वेशीवर पहारा देणारा,
समाजाचे व गावाचे रक्षण करणारा नि गावातील उत्पन, जमिनी व ईतर सर्व सरकारदरबारी
आवश्यक नोंदी ठेवणारा हा समाज होता हे सिद्ध केले आहे.
महार
सुशिक्षित असल्याचे पुरावे
त्याच बरोबर संजय साहेबानी
हे ही सिद्ध केले आहे की जर या समाजावर अशा विविध जबाबदा-या होत्या तर हा समाज
नक्कीच सुशिक्शतही होता. कारण नोंदी ठेवणे वगैरे गोष्टीसाठी विद्येची गरज अपरिहार्य आहे. जर या समाजावर असे
अत्यंत जबाबदारीचे (रेव्हेन्य़ु) कार्य सोपविले होते तर मग ते अशिक्षित असून चालणार नव्हते. मग संजय
साहेबांचा शोध सुरु होतो ते महारांच्या शिक्षणाच्या दिशेनी. महार समाज प्राचीन,
अर्वाचीन व मध्ययुगीन काळात नक्कीच सुशिक्षित होता व कुठेतरी त्याचा पुरावा नक्की
सापडेल नि तो शोधलाच पाहिजे म्हणून ते जिद्दिने पेटून उठतात. शेवटी या काळात महार
सुशिक्षित होते याचा पुरावा ते मिळवतात. ते पुरावे काय आहेत? कसे मिळाले? महार खरच सुशिक्षित होते का? या सर्व
प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात संजय साहेबानी पुराव्यानिशी मांडले आहेत. ते जाणून
घ्यावयाचे असल्यास पुस्तक नक्की वाचा.
महार
समाज धर्मांतरा आधी बौद्ध असल्याचा पुरावा
दुसरा अत्यंत महत्वाचा शोध
असा आहे की बाबासाहेबानी धम्मचक्रप्रवर्तनाद्वारे जी धम्म क्रांती घडवून आणली त्या
आधीही हा महार समाज कधी बौद्ध होता का? बहुतेक होता असेच उत्तर मिळते. यावर संशोधन
करताना संजय साहेबानी एक असा पुरावा मांडला आहे की तो वाचून समस्त बौद्ध समाज थक्क
होणार आहे. महारांची देवी मरीआई. महार समाजावर मरीआईचा मोठा प्रभाव. पण या मरीआईला
बौद्धेय म्हटल्या जात असे असा पुरावा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. याचाच
अर्थ असा की महार समाजावर बौद्ध धम्माचा
प्रभाव आधीसुद्धा होता. ते कसे.... जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
ब्राह्मणांचा
राष्ट्रद्रोह
संजय साहेबांच्या ठायी
असलेले विदवत्तेचे भांडवल अफाट आहे. ज्याच्या बळावर ते अखंड वादविवाद करु शकतात.
या त्यांच्या विद्वत्त्तेची चमक उपरोक्त पुस्तकातून अनेक ठिकाणी जाणवून जाते.
प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करताना कित्येक ठिकाणी तर्काच्या कसोट्या लावून
अत्यंत क्लिष्ट नि गुंतागुंतीचे प्रश्न निकाली काढतात. या देशावरील परकीय सत्तेचे
गमक उलगडताना त्यानी एक स्फोटक संशोधन मांडले आहे. काशी विद्वदसभा व ईतर सर्व पुराणकारानी “या
देशावर यवनांचे राज्य येईल” हे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवून दिले. म्हणून शत्रू
सीमेवर उभा ठाकण्या आधीच आमचे मानसिक खच्चिकरण झाले. हा हा म्हणता एक दिवस यवन
सिमेवर उभा ठाकला. आम्ही अनेक वर्षापासून त्यांची सत्ता येणार हे ऐकून असल्यामूळे
आधिपासून मानसिक पातळीवर खचलेले होतो. त्याना पाहून आजूनच खचून गेलो व त्यांची सत्ता
स्विकारली. त्या नंतर ब्राम्हणानी धर्मसत्ता व मुस्लिमानी राजसत्ता अशी त्यांच्यात्यांच्यात
वाटणी झाली व पुढे सातशे वर्ष आम्ही या दोघांचेही गुलाम राहिलो. आज
पर्यंतच्या सर्व संशोधनाना नवे वळण देणारे हे संशोधन व असे अनेक अकथीत पुरावे
पाहण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
अशा प्रकारे संजय
साहेबांची लेखनी विविध क्षेत्रातून लिलया फिरते व ती थेट इसवी सन पूर्व
सातवाहनाच्या काळा पर्यंत महार समाजाचे अस्तीत नेऊन भिडविते. सातवाहनाच्या काळातील
महारख्ख, महारठ्ठ, रठ्ठ अशा अनेक शब्दांचा अर्थ सांगत त्या काळातील गाव रक्षकांचा,
संपत्ती रक्षकांचा नि व्यापा-यांच्या रक्षकांचा इतिहास सांगताना हे रक्षक कोण होते
याची इत्यंभूत माहिती देते. एके काळी हा
देश आंतराष्ट्रीय पातळीवर व्यापार करण्यात अग्रणी समजला जात होता. त्या वेळी
व्यापा-याना मोठ्या प्रमाणात रक्षकांची गरज पडत असे. त्यामुळे रक्षक समाजाची मोठी
मागणी होती. हाडाने खणखर, बुद्धिने चाणक्ष नि वृत्तीने वीर अशा लोकांची नितांत गरज
असे. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास रक्षक वर्ग हा सेवा (सेक्युरिटी) देणारा वर्ग
होता. हा रक्षकांचा तेजोमय काळ सातव्या-आठव्या शतका पर्यंत अस्तीत्वात होता. पण हळू हळू यवनांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर व्यापार
बंद झाले. त्यामुळे रक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर
बेरोजगार झाला. त्याची अवणती सुरु झाली. हळू हळू त्याची एक वैभवशाली सेवा
गावातील पाटल्याच्या, कुणब्याच्या घरी गहाण पडू लागली व ईथे सुरु झाली गुलामी. या
गुलामीची पाळं मुळं कुणाशी जाऊन मिळतात? का बरं एक पराक्रमी नि शूर समाज हतवीर्य
होऊन अस्पृश्य बनला? कोणत्या समाजानी यांच्यावर आघात केला? कशा प्रकारे एका अप्रतिम सेवाक्षेत्राला
महारकीत बदलण्यात आले? हे सर्व जाणून घेण्यासाठी वरील पुस्तक नक्की वाचा.
जाता जाता संजय साहेबानी
या पुस्तकात आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीचा समाचार घेताना अत्यंत मर्मभेदक,
मनोवेदक नि मार्गदर्शक चर्चा केली आहे. त्यांची संशोधनाची शैली, अविरत कष्ट नि
जिज्ञासू वृत्ती याचा परिपाक म्हणजे “महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप”
सर्वानी
आवर्जून वाचावे नि संग्रही ठेवावे, असे पुस्तक आहे.
------------------------------------------------
पुस्तकाचे
नाव: महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
प्रुष्ठ
संख्या : ११२
मुल्य:
रु. १००/-
प्रकाशक:
पुष्प प्रकाशन
एकमेव
वितरक: भारत बुक हाउस,
१७८८,
सदाशिव पेठ,
देशमुखवाडी,
पुणे-३०.
मो.
९८५०७८४२४६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा